कलेक्टरांचा आदेश:-मानसून पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबांनी सर्व विभागांना कोणते आदेश दिले?
मानसून पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबांचे सर्व विभागांना स्पष्ट आदेश!
👉महत्त्वाच्या सूचना व उपाययोजना:-
हतनूर धरण व पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये सतर्कता-विसर्ग नियंत्रित ठेवण्याचे आदेश
नद्यांमधील गाळ काढण्याचे आदेश, पूल सुरक्षिततेसाठी उपाय
शाळांची तातडीने दुरुस्ती – जिल्हा परिषद
औषध साठा, रुग्णवाहिका, कर्मचारी सज्ज ठेवणे-आरोग्य विभाग
अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटविणे-सर्व नगरपरिषद व नगरपालिका प्रशासन
महावितरणने वीजसंचारण यंत्रणा तातडीने दुरुस्त करावी
आपदा मित्र’ प्रशिक्षण व किट वितरण-स्वयंसेवी संस्थांना सामावून घेण्याचा उपक्रम
शोध व बचाव साहित्य तपासणी व सज्जता – सर्व विभागांना आदेश
24x7 नियंत्रण कक्ष स्थापन करावेत-प्रत्येक विभागाच्या कार्यालयात
🌧️मान्सून काळात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे. कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी,” असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. आयुष प्रसाद (IAS) यांनी दिले.
🇮🇳 जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत विविध उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.
👉 उपस्थित अधिकारी: अपर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नरवीर रावळ, पाटबंधारे, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा, नगरपालिका, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.
जळगाव जिल्हा पूरप्रवण आहे. योग्य नियोजन, समन्वय आणि सज्जता यांमुळे आपत्ती रोखता येते. नागरिकांनीही खबरदारी बाळगावी व प्रशासनास सहकार्य करावे


Comments
Post a Comment